Sunday, October 12, 2025

 मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव बदलून पुन्हा नव्या नावाने चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय.‌ या आधी हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाविषयी केलेली‌ याचीका माननीय कोर्टाने फेटाळून लावली होती.

पण आता जर निर्माता नाव बदलत असेल तर त्याचा हृया चित्रपटाबाबत व्यावसायिक दृष्टिकोन आहे कि लोकांच्या भावनेचा आदर आहे हे समजून घेतले पाहिजे.‌
समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले " मनाचे श्लोक" हे स्टिव्हन कव्हे यांच्या सेवन हॅबिट ऑफ हायली इफेक्टीव पिपल हे पुस्तक किंवा, द हॅबिट हे पुस्तक व स्टोईझम यांच्या तोडीचे विचार आहेत. सकाळी उठल्यावर सकारात्मकता निर्माण करण्यासाठी हे श्लोक आहेत.
मनाचे श्लोक मधे काय लिहिले आहे..
पुढे वैखरी राम आधि स्मरावा.
परा पश्चंची मध्यमा आणि वैखरी या मनाच्या चार अवस्था आहेत यातील वैखरीच्या आधीची म्हणजे सबकाॅन्शस व काॅन्शसनेस यावेळ्या अवस्थेत म्हणजे दुसरे कोणतेही विचार व विकार मनात येण्यापूर्वी सकारात्मकता निर्माण व्हावी हे सांगितले आहे.
बर‌ं सिग्मंड फ्राईड हा मानस शास्त्रज्ञ हिच सबकाॅन्शस व काॅन्शसनेस माईंड ची गोष्ट १८ व्या शतकात सांगतो.
विनोबा भावे यांच्या मते, ‘मनाचे श्लोक’ ही रामदासांची अपौरुषेय वाणी आहे.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजा महाराज म्हणतात, ‘’सामान्य माणसानेमोठमोठाले ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी मनाचे श्लोक पाठ करावेत व त्यात सांगितल्याप्रमाणे साधन करावे. त्यांना खात्रीने भगवंताचे दर्शन होईल.”
हि झाली वस्तुस्थिती.‌ पण १६ व्या शतकातील समर्थ रामदासाचे विचार निर्माता , न्यायाधीश, कायदे यांच्यापुढे कुचकामी ठरतात.‌ कारण गेल्या काही वर्षांतील घडत असलेल्या घटना पाहील्या की हे फक्त ईतर धर्मासाठी आहे आणि बहूसंख्य हिंदू लोकांसाठी नाही. असे वाटते ..
संविधानाच्या चौकटीत राहून विचार केला तर संविधानचे कलम २५ स्वतःच्या धर्माबद्दल आदर ठेवणं, त्याचा अंगिकार करणे हे सांगितले आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्या धर्मातील लोकांना तुमच्या वागण्यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे हे संविधान सांगितले आणि असे चुकीचे झाले तर राज्यसंस्था योग्य ती कारवाई करू शकते.‌
नृपूर शर्मा प्रकरणातील काही लोकांची भुमिका व प्रेषितांचा प्रेषित भगवान विष्णू बद्दल टिप्पणी, किंवा समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक या बद्दल ची भुमिका पाहीली तर हिंदू देवतांची, ग्रंथाची बदनामी याबद्दल राज्यव्यवस्था कायम उदासीन राहीली आहे. धर्मनिरपेक्षता या नावाखाली बहूसंख्य लोकांच्या आस्था, प्रतीके, संस्कृती यावर बिनधास्त टिप्पणी करणे चालू असते.‌
जर एखाद्या या आस्थेबद्दल कोणी बोलला तर लगेच वामपंथी याला मनूवादी लेबल लाऊन टाकतात..
पण तत्पूर्वी ते बोलणारे महत्वाची गोष्ट लक्षात घेत नाहीत कि प्रत्येक हिंदू हा मनापासून जाणतो कि मनूस्मृतीची जागा भिमस्मृती ने‌ म्हणजे संविधानाने घेतली आहे.‌भिमस्मृती हि आजच्या काळातील आहे स्वातंत्र्य, समता , व एकमेकांबद्दल आदर देणारी आहे. स
स्वर्गीय वाजपेयी यांच्या विचारानुसार देश हा मनूस्मृती वर नाही तर भिमस्मृतीवर चालतो.‌
परंतु हे सर्व वामपंथी, तथाकथित पुरोगामी मानतात का? प्रत्येक बाबतीत ते ट्विट व कलूषित भाषणातून हिंदू धर्माबद्दल द्वैष मनूस्मृती, मनूवादी अशा शब्दांत पाजळत असतात.‌ बहूसंख्य हिंदू बद्दल हा तिटकारा का ?
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मनूस्मृती हि सगळीच चांगली होती असं नाही कालानुरूप ती गरजेची होती. नंतर ती. कालबाह्य झाली व त्यातील काही गोष्टितर त्याज्य झाल्या. म्हणून " सर्व ही तपसा साध्यम् " असा‌ कार्यरत रहाणाऱ्याचा संदेश देणारे मनू ऋषी सगळेच चुकीचे होते व मनूवादी मनूवादी म्हणून लोकांची हेटाळणी करणे चुकीचे आहे. त्याकाळी तत्कालीन राज्यसंस्थेसाठी ती अनूरूप होती.‌
तसेच भिमस्मृती हि देशासाठी आजच्या गरजेनुसार आमूलाग्र विचारप्रवर्तक आहे. ती वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेउन सार्वभोमत्व, न्याय , समानता, प्रजासत्ताक , लोकशाही या तत्वाचा वापर करते.‌
भिमस्मृती कोणत्याही धर्माच्या साठी नाही.‌‌ ती सर्व धर्म पंथासाठी आहे. तीचा सन्मान करणे प्रत्येक व्यक्तीला कितीही मोठ् सर्वोच्च पदावर असली‌ तरी मान्य केलेच पाहीजे.
वैयक्तीक आयुष्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या २१ प्रार्थनेत पैकी पहीली प्रार्थना " मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही " किंवा हे तत्व श्रद्धा म्हणून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात व वैयक्तिक धर्मासाठी पाळताना कोणालाही हरकत असायचे कारण नाही.
माझाच देव सर्वात मोठा हे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात व वैयक्तिक धर्मासाठी पाळताना कोणालाही हरकत असायचे कारण नाही.
पण भगवान‌ विष्णू जो हिंदू धर्मासाठी पालनकर्ता आहे. त्याबद्दल बोलताना सर्वांनी‌ जागरूक राहीले पाहीजे. कोणत्याही ईतर धर्माचे पालन करणारे व कोणत्याही छोट्या किंवा सर्वोच्च पदावरील व्यक्तीने संविधानाच्या २५ व्या कलमाला पण पाळलेच पाहिजे.‌ तेही वैयक्तिक श्रद्धेला बाजूला ठेवून..
अन्यथा तो‌ भिमस्मृतीचा (संविधानाचा ) देखील अपमान आहे.
हे देखिल वामपंथी व तथाकथित पुरोगामी लोकांनी मान्य केले पाहिजे.कि हिंदूचे शांततामय सहजीवन म्हणजे बुळगेपणा नव्हे. तर भिमस्मृतीतील तत्वाचा अवलंब करून जगणे आहे.‌
आणि हिंदू धर्मातील लोकांनी यापुढे अशा गोष्टी टाळायची असेल तर त्यांच्या नवा अट्रोसिटी कायदा आणण्याची गरज आहे ज्यामध्ये हिंदू देवदेवतांची , धार्मिक पुस्तकांची श्लोकांची. बदना

No comments:

Post a Comment