Thursday, September 18, 2025

 माझं अस्तित्व, माझं जगणं , माझं जगणं, माझा आनंद, माझी वर्तणूक ही माझी माझी माझी नाहीये..

आई, बाप, आजी ,आजोबा, दादा, दादी, नाना, नानी, पणजोबा,खापर पणजोबा, खापर खापर पणजोबा या सगळ्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मानव वंश पुढे नेण्यासाठी केलेल्या कष्टाचे, झगडण्याचे , त्यानी केलेल्या वर्तणूकीच्या मापदंडांचे म्हणजेच परंपरेचे. स्थलांतरित भटके पणापासून स्थिर कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे.. त्यांनी परीस्थितीचा अभ्यास करून निसर्गाशी जुळवून घेत विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून मार्गक्रमण केली. विविध संशोधने केली‌
तुमचं अमुक पद्धतीने बोलणे , तुमचं स्थानांतरीत , स्थलांतरित होणे हे कुठेतरी तुमच्या पुर्वजांमूळे झालंय
फक्त गेल्या १० पिढ्यांचा विचार केला तरी आई बाबांच्या कुटूंबातील ४०९६ पितरांनी तुमच्या अस्तित्वात येण्यापूर्वी खस्ता खाल्ल्या आहेत. कित्येक रुपात कित्येक नावांनी ते इथे पृथ्वीवर आले. त्यांच्या आकांक्षा , ईच्छा व सदिच्छा तुमच्या सोबत आहेत..
गंमतीशीर बाब म्हणजे यातील एक जरी दुवा पुर, दुष्काळ, युद्ध , आक्रमणे आणि साथीचे आजार त्यामुळे तुटून पडला असता म्हणजे एक आई बाबा नसते तर पुढचा वंश वाढला नसता आणि आज तुम्ही हि पोस्ट वाचू शकला नसता...
त्यासाठी कृतज्ञ रहाणं तुमचं कर्तव्य नाही का?
त्यांचं ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता दाखवण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी काढून दहि भाताची काकवळ ठेवत असाल तर सकारात्मक मन व जिंकावे कसे. (Positive mindset and how to win. ) या तुमच्या आवडत्या विषयावरील विविध भाषेतील हजारो पुस्तकातील महत्वाचा असा ग्रटिट्यूट /. कृतज्ञता हे प्रकरण तुम्ही मनापासून करताय व आणि भारतीय पद्धतीने त्याची अंमलबजावणी करताय. हे सिद्ध होते..
अणि लक्षात ठेवा मोज्यात देव वस्तू ठेवतो , संत कमीत कमी ३/५ चमत्कार करतो एका दिशेने प्रार्थना करून देवापर्यंत पोहोचतो हे खरं असेल तर कावळा , गाय इत्यादी प्राण्यांच्या पोट भरण्याने, त्यांनी दिलेल्या तृप्तीचा ढेकर पुर्वजांच्या प्रती आपली कृतज्ञतेची भावना पुर्ण होत असेल तर त्यालाही श्रद्धा म्हणायला हवी ना ?
पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात व दिवाळीच्या रोषणाईच्या प्रकाशात परत जातात असे म्हणतात.