Sunday, July 27, 2025

 TK आणि GI उल्लंघनाविरोधात कोल्हापुरी चप्पलसंदर्भात निषेध – ट्रेंडमध्ये

अलीकडे इटलीमधल्या मिलान शहरात एक फॅशन शो झाला. तिथे एका मोठ्या फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पल वापरली, जी भारताची पारंपरिक ओळख आहे. पण त्यांनी या चप्पलचं योग्य नाव घेतलं नाही, म्हणजे भारताला किंवा कोल्हापुराला क्रेडिट दिलं नाही. त्यामुळे अनेक भारतीय लोक नाराज झाले आहेत.
इंस्टाग्रामवर लोक याविरोधात पोस्ट टाकत आहेत. अशा पोस्ट २०,००० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केल्या आहेत. लोकांचं म्हणणं आहे की कोल्हापुरी चप्पल ही आपल्या परंपरेचा भाग आहे आणि तिचा आदर केला पाहिजे.
ही गोष्ट ESG नावाच्या मूल्यांशी जोडलेली आहे.
ESG म्हणजे Environmental, Social आणि Governance (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासनविषयक मूल्यं).
या अंतर्गत खालील गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात:
• पर्यावरणाची काळजी घेणं
• समाजात न्याय आणि समानता राखणं
• पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन
ESG च्या "Social" भागात परंपरा, संस्कृती आणि स्थानिक ज्ञानाचं रक्षण करणं येतं.
२०१९ साली कोल्हापुरी चप्पलला GI टॅग मिळाला होता.
GI म्हणजे Geographical Indication (भौगोलिक निर्देशांक) – म्हणजे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या खास वस्तूंसाठी मिळणारा ओळख टॅग.
यामुळे त्या वस्तूची खास ओळख आणि गुणवत्ता सिद्ध होते. पण त्या फॅशन ब्रँडने हे नियम पाळले नाहीत आणि कोल्हापुरी चप्पलचं योग्य नाव घेतलं नाही.
कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इथल्या लोकांनी ६,००० पोलिश लोकांना मदत केली होती. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या परंपरेचा खूप अभिमान आहे. म्हणूनच त्यांच्या बनवलेल्या चप्पलचं योग्य नाव न घेतल्यामुळे त्यांना वाईट वाटतंय.
ही घटना आपल्याला आठवण करून देते की पारंपरिक ज्ञानाचा (TK – Traditional Knowledge) सन्मान करणं गरजेचं आहे.
TK म्हणजे आपल्या आजी-आजोबांकडून आलेली पारंपरिक माहिती, पद्धती, कौशल्यं, चिन्हं आणि सांस्कृतिक वारसा.
WIPO (World Intellectual Property Organization) ही आंतरराष्ट्रीय संस्था TK आणि GI साठी नियम बनवते.
आशा आहे की त्या फॅशन ब्रँडला कोल्हापुरी चप्पलच्या GI टॅगचं आणि भारताच्या परंपरेचं महत्त्व समजेल, आणि ते भविष्यात योग्य आदर दाखवतील.

Friday, July 4, 2025

 तुमच्या वर कोण राज्य करते यावर तुमची बोली भाषा अवलंबून असते. उदा लॅटिन अमेरिकावर स्पॅनीश, पोर्तुगीजचा व भारतावर इंग्रजीचा प्रभाव आहे. पण त्यापुर्वी भारतावर प्रभाव होता तो खडी हिंदी भाषेचा. फारसी मिश्रित हिंदीने देवनागरी लिपी घेतली व स्थानिक भाषा घेतल्या त्यावेळी मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रभावामुळे लष्करी व कामकाजात मराठी व संस्कृत मिश्रित खडी हिंदीचा समावेश झाला. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बहुतांश मराठी शासक सरदार असल्याने (पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड ) मराठी युक्त हिंदी राज्य करायला मराठी सरदारांना सोपी झाली. त्यामुळे हिंदी बोलणे सर्वात सोपे कोणाला जात असेल तर मराठी माणसाला.

एकेकाळी मराठ्यांच्या मुळेच जास्त प्रचलीत झालेली हिंदी भाषा आता मराठी माणसाला कशी त्रासदायक होईल. आपल्या पेक्षा कितीतरी छोटी संख्येने लोक बोलत असलेली फ्रेंच, जर्मन, इटालीयन, स्विडीश भाषा टिकुन आहेत.कारण या भाषेतील लोक ज्ञानाधिष्ठित आस्थापनांच्या (कंपन्यांच्या) मार्फत जगावर राज्य करतात. भाषिक आक्रमणाची भिती न बाळगता आपल्या भाषेत अधिक अधिक ज्ञान निर्माण करणे व ज्ञानाधिष्ठित व्यवसायाने जगावर अधिराज्य गाजवणे हे मराठी व महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहे.
तुम्ही जोपर्यंत आर्थिक व वैज्ञानिक बाबीत मराठी वापर करीत नाही तोपर्यंत मराठीची वृद्धी कठीण आहे लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल सोशल मिडियावर मराठीत लिखाण करणारे १० लोक पण नाहीत यात मराठी माणसाचा कमीपणा नाही का? मराठी माणूस मराठी चित्रपट पहायला सिनेमागृहात जात नाही आणि तरीदेखील आशयसंपन्न चित्रपटांची मागणी करतो . हे म्हणजे दुटप्पीपणाचे लक्षण नाही का .
माझ्या पाहण्यातील बहूतांश लघू मध्यम वर्ग व मध्यम मध्यम वर्ग आपल्या मुलांना महागड्या स्थानिक इंग्रजी शाळेत घालतो. जिथे शिक्षक म्हणून कोणत्याही पदवीधारकांना भरले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होतो. पण पालक मात्र माझा मुलगा/गी इंग्रजी शाळेत शिकतो म्हणून खुष आणि कर्जात असतात. मराठीचा मुद्दा पुढे करणारे राजकारणीच इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारण्यात व भरपूर फी घेण्यात पुढे असतात. यामुळे सुंदर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा हळुहळू बंद होत आहेत.
त्यामुळे भाषेचा मुद्दा भावनिक न करता, आर्थिक ताकदीचा व व ज्ञानाचा केला पाहीजे. आणखी एक अवलोकन: इंग्रजी किंवा दक्षिण भारतीय चित्रपट तेलगू, तामिळ व कन्नड मधे भाषांतरीत होतात व सिनेमागृहात लागतात. पण मराठी माणूस मात्र याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती पहायला गर्दी करतो. कितीही मोठा मराठी कलावंत असेल तरीही टिव्हीवर तो हिंदी कलाकारांना अवास्तव आदर देतो व प्रेक्षकही मुंबईत वर्षानूवर्षे रहाणाऱ्या हिंदी कलावंताचे एक तोडकेमाडके मराठी वाक्य ऐकूनही भारावून जातो. आणि टाळ्या वाजवतो. अरे तो महाराष्ट्राचा ईतके वर्ष भाग आहे आणि त्याला/तिला मराठी आले पाहीजे हि साधी अपेक्षा नको का?
मराठी येत असताना हिंदीचा वापर आर्थिक व ज्ञानाधिष्ठित प्रगतीसाठी कसा करता येईल हा विचार क्षणोक्षणी केला तर हिंदीचा राग व द्वेष निघून जाऊन मराठीचा उत्कर्ष व ईतर भाषांबद्दल आदर चालू होईल व मराठी भाषा शिक्षणाचे ईतर भाषिक लोकांसाठी वर्ग (क्लासेस) चालू होतील.
जय मराठी
प्रशांत पेडणेकर.