*मुळसंकल्प ते सिद्धीचा विनायक*
गणपती बाप्पा म्हणाला " तुला काय तुझे विधिलिखित ठाउक ? कदाचित तुझ्या भविष्यात काही पान मी कोरी ठेवली असतील व त्यावर मी तथास्तू , इच्छापूर्ती व स्वप्नपूर्ती अशा शब्दानी लिहुन ठेवली असतील व त्या पानांवर तुझे सर्व संकल्प सिद्धीस जाणार असतील. सर्व स्वप्ने पुर्ण होणार असतील.
आणि तुझ्या संकल्पाना साकार करण्यासाठी मी सिद्धिविनायक असेन "...
कदाचित प्रत्येक गणपती , प्रत्येक वेद , प्रत्येक संत आपल्यातल्या भांबावलेल्या लहान मुलाला हेच कानीकपाळी सांगतील ....
"तु जागा हो आणि आधी सुरवात तर कर मी आहे ना तुला तथास्तू म्हणुन जिंकवायला"
संत ज्ञानेश्वरानी सांगितले
"ओम नमो जी आद्या ।वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा।।"
आद्य ओंकारस्वरुपी आत्मरुपी असणारा गणेश हा स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच्या स्वतःच, योग्य तसाच, संपूर्णपणे देखील जाणला जावा असा आहे आणि मी स्वत:स सांगत नाही संकल्प करत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे.
संत नामदेवजी सांगतात
''ओम नमो जी गणनायेका।सर्वसिध्दिफळदायेका ।
अज्ञानभ्रांति छेदका ।बोधरूपा ।। ''
गणपती हा मागतील त्याची सर्व सिध्दि करणारा व फळदायक आहेत . पण त्यासाठी पहील्यांदा अज्ञानातून तू बाहेर तर पड ! ....
संत रामदासानी तर गणेशाला सुखकर्ता व दु:खहर्ता म्हणजे आयुष्यात सकारात्मकता आणून सुख देणारा व नकाराकत्मतेला हरवून दैन्य दु:ख घालवणारा म्हटलय.
गुरु नारदांनी नारदपुराणात सांगीतल आहे.
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये
म्हणजे आयूष्यातील कोणतेही काम पुर्ण करायचे असेल स्वत:मधील गणपतीला सांग कि काय व कसे काम करायचे.
आपल्या मेंदूचा खालून पाहील्यावर दिसणारा भाग हा गणपतीच्या डोळे व सोंडेसारखाच आहे. श्री टोनी नाडर या लेखकाने ह्युमन फिजीओलोजी : एक्स्प्रेशन आफ वेद ॲन्ड द वेदिक लिट्रेचर या पुस्तकांत ही बाब नमूद केली आहे. त्यामूळे हा सिद्धी गणेश बाहेर नाही तर तुमच्या मनातच आहे असे वाटते.
त्यामूळेच तुकारामानी
मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली,मने इच्छा पुरविली, मन माउली सकळाची
असे म्हणले असेल व इच्छापूर्ती करायला मनालाच सांगीतले असेल.
अथर्वशीर्षात तर सांगीतलय कि
अहं मुलाधारस्थितोसी नित्यम्
म्हणजे मी तुझ्या श शरीरातील कुंडलीनी जागृत करून आयूष्य सुखकर करणा-या सात चक्रापैकी मुलाधार चक्राच्या ठिकाणी वास करतो . मुलाधार म्हणजे मुळस्थानी असलेला आधार म्हणजे पाया, म्हणजेच आपल्या शरीरातील अंतर्मन, जर पाया दणकट व सकारात्मक असेल तर कशाची चिंता करायची नाही. कारण या ठिकाणीच चिंतामणी गणेश म्हणजे सर्व इच्छा अपेक्षांचे पुर्णत्व करणारी देवता आहे .
मूलाधार चंक्र जागृत करण्यासाठी लं (Lam) हा मंत्र आहे ,प्राणायाम केल्यानंतर हा मंत्र १५ मिनीटे म्हणतात. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपले अचेतन मन (Subconscious mind) जागृत करून पुढील आयूष्याचा मार्ग (प्रारब्ध) ठरवत असतो. आपल्या व्यक्तीमत्वाचा. पाया किंवा आधार हे मुलाधार चक्र ठरवते व याठीकाणी विनायक /गणेश असतो.
हे चक्र सकारात्मकतेने परीपुर्ण आहे , स्फूर्ति , उत्साह व विकास हे याचे फायदे आहेत .
लाल रंगाने दर्शवलेले मुलाधार चक्र कमळाच्या चार पाकळ्यानी संकेत देत असते कि उर्जा , गती , जागृती व विकास हे गणेशाच्या मुलाधार चक्राची अंगे आहेत..
जर तुम्हाला इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती हवीय तर पहील्यांदा श्री गणेशा करा आपल्यातील बु्द्धीला सांगा कि तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार
तुझ्यातील गणपतीच तुला सिद्धीविनायक करणार आहे . सर्व संकल्प सिद्धीस नेणार आहे तथास्तू म्हणणार
गणपती बाप्पा मोरया !!!!

No comments:
Post a Comment